![]() |
| सांगली अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष गणेशराव गाडगीळ. |
◼️वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात
◼️अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्यासह संचालकांचे अभिनंदन
सांगली / प्रतिनिधी
येथील सांगली अर्बन बँकेची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी सभासदांना ७ टक्के लाभांशची घोषणा केली. विशेष म्हणजे लाभांश घोषित होताच तो तातडीने सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. दरम्यान यापुढच्या काळात सभासदांना अधिक दर्जेदार, अत्याधुनिक सोयी - सुविधा, शाखा विस्तार करू अशी ग्वाही अध्यक्ष गाडगीळ यांनी दिली. सांगली शहरातील काही जवळ असलेल्या शाखा स्थलांतर करण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही यावेळी सर्वानुमते करण्यात आला.
अध्यक्ष गाडगीळ यांनी प्रास्ताविक करत बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. बँकेस २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु.१४ कोटी ६७ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या ठेवींमध्ये ९६ कोटीची वाढ होऊन एकूण ठेवी १२७७ कोटी २१ लाख इतक्या झाल्या आहेत. तसेच कर्जा मध्ये ७२ कोटी इतकी वाढ होऊन ७६० कोटी ७२ लाख इतके कर्जांचे वाटप झाले आहे. बँकेच्या एकत्रित व्यवसायात वाढ होऊन २००० कोटींचा टप्पा पार झाला आहे. बँकेच्या एन.पी.ए मध्ये लक्षणीय घट होऊन निव्वळ एन.पी.ए चे प्रमाण केवळ १.२२ % इतके आहे. रिझर्व बँकेच्या निकषाप्रमाणे सी.आर.ए.आर चे प्रमाण किमान १२ % आवश्यक आहे ते १४.९२ % इतके झाल्याचे अध्यक्ष गाडगीळ यांनी सांगितले.
![]() |
| Advt. |
सभेपूर्वी सभासद प्रशिक्षण झाले. यावेळी प्रा. सतीश होनराव यांनी सायबर सिक्युरिटी या विषयावर सभासदांना अत्यंत विस्तृत मार्गदर्शन केले, वक्ते श्री सतीश होनराव सर यांचा परिचय संदीप कुलकर्णी यांनी करून दिला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. होनराव सर यांनी उत्तरे दिली. नफा तोटा पत्रकाची वाटणी, लेखापरीक्षक नियुक्ती, लेखापरीक्षकांनी सुचवलेली कर्ज खाती निर्लेखित करणे आदी ठराव यावेळी मंजूर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांनी विषयांचे वाचन केले. यावेळी उपस्थित सभासद यांचे तर्फे अध्यक्ष गणेश गाडगीळ, उपाध्यक्ष श्रीपाद खिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक सर्व संचालक मंडळ यांचा विशेष सत्कार करणेत आला. यावेळी सभासदांनी मनोगत व्यक्त करताना सभेचे उत्तम व नेटके नियोजन करून सभा यशस्वीपणे संपन्न झालेबदल अभिनंदन व समाधान व्यक्त केले.
या सभेस उपाध्यक्ष सी. ए श्रीपाद खिरे, संचालक श्री सी. ए अनंत मानवी, संजय पाटील, श्रीकांत देशपांडे, डॉ. रवींद्र आरळी, एच.वाय पाटील, संजय धामणगावकर, शैलेंद्र तेलंग, सागर फडके, सागर घोंगडे, रणजित चव्हाण, सतीश मालू, कालिदास हरिदास, मनोज कोरडे, रवींद्र भाकरे, सौ. अश्विनी आठवले, सौ. स्वाती करंदीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर तसेच बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले. सुहास दिवेकर यांनी पसायदान म्हटले. सभेची सांगता झाली.

