yuva MAharashtra पुरपट्ट्यातील ४७१ नागरिकांचे स्थलांतर

पुरपट्ट्यातील ४७१ नागरिकांचे स्थलांतर

सांगली टाईम्स
By -

 


- ९१ कुटुंबाचा समावेश
-  पाणी पातळी ३६ फुटांवर

सांगली / प्रतिनिधी
कोयना, वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ३६ फूट इतकी झाली आहे. परिणामी पुरपट्ट्यातील ९१ कुटुंबातील ४७१ नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. दरम्यान सांगली शहरातील अमरधाम स्मशानभूमीतही पाणी शिरले आहे. येथील दहनविधी बंद करण्यात आले आहेत. कुपवाड येथील स्मशानभूमीमध्ये दहन करण्याची सोय करण्यात आली आहे. 
20ऑगस्ट, 2025   वेळ - 11 Am वाजता

🌊 आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी  35 फुट  9 इंच
🌊 आयर्विन पूल, सांगली येथील इशारा पातळी 40 फूट व धोका पातळी 45 फूट

🌊 कृष्णाघाट, मिरज येथील पाणी पातळी 45 फुट 0 इंच
🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील इशारा पातळी 45 फूट व धोका पातळी 57 फूट

📞 आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक 
7066040330 / 7066040331 / 7066040332
                     
मदत व बचावकार्य कक्ष                                                                          
🚒 अग्निशमन दल 🚒 *📞संपर्क क्रमांक*
टिंबर एरिया, सांगली - 0233-2373333
स्टेशन चौक, सांगली -0233-2325612
कमानवेस, मिरज - 0233-2222610



यामध्ये सुर्यवंशी प्लाॅट ( कुटूंबे १५  नागरीक ८९), आरवाडे पार्क- (कुटूंबे २६ नागरीक १३८), कर्नाळ रोड पटवर्धन कॉलनी (कुटूंबे ५० नागरीक २४४) कुटुंब व नागरिकांचा समावेश आहे. सर्व नागरिकांनी खासगी ठिकाणी स्थलांतर केले आहे. महापालिकेच्या निवारा केंद्रात अजून एकही नागरिकाने आसरा घेतलेला नाही. 

Tags: