कन्फर्म ! विराट लवकरच भारत सोडणार, कुटुंबासह कुठे होणार शिफ्ट ? कोचनीच थेट सांगितलं…
विराट, अनुष्का हे दोघं वामिका आणि अकायसह लंडनमध्ये स्थायिक होऊ शकतात अशी चर्चा बऱ्याचा काळापासून सुरू होती. अकायच्या जन्मानंतर ते दोघेही मुलांसह अनेकदा लंडनमध्ये स्पॉटही झाले. मात्र त्यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. पण आता विराटच्या कोचनीच याबाबत वक्तव्य केल्याने ही बातमी जवळपास कन्फर्म झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान राजकुमार शर्मा यांना विराटच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला होता.
विराट भारत सोडून कायमचा लंडनला शिफ्ट होण्याची योजना आखत आहे का ? असा प्रश्न राजकुमार यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. हो, विराट असा प्लान आखत आहे. तो लवकरच पत्नी अनुष्का आणि मुलं वामिका-अकायसोबत लंडनला शिफ्ट होईल, असं ते म्हणाले.
विराटचं घरं कुठे असेल ?
मूळचा दिल्लीकर असलेल्या विराटचं एक घर राजधानीत तर दुसरं घर मुंबईतही आहे. तसेच अलीबागमध्येही त्याने एक बंगला खरेदी केल्याचे वृत्त आहे. पण आता तो भारत सोडण्याचा विचार करत असून त्याचं नव घर लंडनमध्ये असू शकतं. मात्र यावर विराटने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोहलीच्या निवृत्तीबाबत काय म्हणाले कोच ?
विराटचे कोच राजकुमार शर्मा यांना विराटच्या निवृत्तीबाबतही प्रश्न विचारण्यात आले.बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर विराट निवृत्तीचा निर्णय घेणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर राजकुमार शर्मा म्हणाले की असं अजिबात होणार नाही. विराट अजूनही तंदुरुस्त आहे. त्याचं अजून इतकं वय झालेल नाही. तो अजून 5 वर्ष सहज ( क्रिकेट) खेळू शकतो. तो 10 वर्षांचा होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतो, त्याच्याकडे अजून बराच खेल आहे, असे कोच शर्मा म्हणाले.
विराट कोहली सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत आहे. मालिकेतील पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी म्हणून त्याच्या बॅटमधून फक्त 1 शतक झळकलं. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद 100 धावा केल्या. या एका शतकासह त्याने 3 कसोटी सामन्यांच्या 5 डावात 126 धावा केल्या आहेत.